Thursday 10 April 2014

रक्तदान शिबीर - २०१४

|| हरी ॐ ||


|| ॐ मन:सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः ||

रक्तदान शिबीर - २०१४

मानवाची निर्मिती ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृति. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करीत आपले जीवन निरोगी व सुखकर  करण्याचा प्रयास चालवला आहे.असे असूनही मानवाला आजतोवर रक्ताला पर्याय शोधता आला नाही.एका मानवाचेच रक्त दुसऱ्या गरजू मानवाला वाचवते.

मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. ही बाब लक्षात घेवुन सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन, सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र , कोल्हापूर यांच्या सयुक्त विद्यमाने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.याहीवर्षी रविवार दिनांक 27 एप्रिल 2014 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

रक्तदानाचे अध्यात्मिक महत्व आपल्याला सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनीं अगदी सहजतेने समजावले आहे.बापू कोणताही उपक्रम राबवतात त्यामागे आपल्या श्रद्धावान मित्रांच्या उन्नतिसाठी निश्चित असा एक हेतु असतो. रक्तदान केल्याने य़ज्ञेन दानेन तपसा या तिनिही गोष्टी बापू आपल्याकडून करवून घेतात.

य़ज्ञ:- यज्ञ म्हणजे काय ? तर समर्पणाच्या भावनेने परमेश्वरास स्मरुण केलेले पवित्र कार्य.
आपण ज्यावेळी रक्तदान करायला जातो त्यावेळी आपल्या सगळ्यांच्या मनात हीच भावना असते म्हणजेच हा एक प्रकारचा यज्ञच बापू आपल्याकडून करुन घेतात.


दानेन:- म्हणजेच दान करणे. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता ज्यावेळी एखादी गोष्ट आपण दुसऱ्यास देतो.........का ? कारण ते माझ्या सदगुरुला आवडते .
म्हणून तर त्या त्यागाला दान असे म्हणतो आणि असे सत्पात्री दान रक्तदानातुन बापू आपल्याकडून करवून घेतो.
माझ्या सदगुरुला आवडनारया नऊ थेंबांपैकी, आवड़णारया रक्ताचे थेंब मी त्याच्यावरच्या प्रेमापोटी माझ्या गरजू आप्ताला देत आहे.
कितीही पैसे मोजले तरी एखादी गोष्ट पर्यायाने मिळू शकेल पण वेळप्रसंगी रक्तच रक्ताच्या कामी येते,त्यामुळे रक्तदानाला मोल नाही.
हे अमूल्य दान आहे म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटलेले आहे.

तपसा:- म्हणजेच तप करणे. कलियुगात तप करणे म्हणजे कोणत्याही जंगलात जावून किंवा गुहेत बसून आसन लावणे नव्हे तर तप म्हणजे दिनदुबळयांची सेवा करणे.
आणि हीच सेवा बापू रक्तदानातुन आपल्याकडून करवून घेतात.या मागेही बापुंचा हेतु हाच असतो की माझ्या बाळांची प्रगति होवून या समाजाची उन्नति व्हावी, कारण तप केल्याने आम्हाला काय मिळते?...

1) तपश्चर्येचा जेवढा साठा वाढत जातो,तितके पवित्र व निर्मळ स्थान मनुष्याला प्राप्त होते.
2) तपश्चर्येने चिंतन शक्तिमान व रसमय होते.
3) तपश्चर्येने असाध्य ते साध्य होत असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या अनंत अडचणी आहेत ज्या आपणास असाध्य वाटतात त्या साध्य करण्यासाठी रक्तादानासारख्या तपाची आवश्यकता आहे.

आज आपल्याला प्रत्येकाला वाटते की मला जो आनंद बापूंमुळे मिळत आहे तोच आनंद इतरानाही मिळो, मग यासाठी रक्तदान ही चालून आलेली संधि आहे.
आपण आपल्या शेजारी , नातलग, मित्रमंडळी याना आपल्या संस्थेच्या रक्तदान शिबिरासंबधी सांगितले पाहिजे.

मग त्यांचा प्रश्न आला की कोण हे बापु ?
तर मग त्या ठिकाणी आपल्याला गुणसंकीर्तन करण्याची संधि मिळूण आपल्या बापुंची इत्यंभुत माहिती देता येवू शकते व त्यांना बापुंपर्यन्त पोहचता येवू शकते. आणि तो एकदा बापुंचा झाला की बापुच त्याचा कायमचा होतो व त्याच्या जीवनात आनंदच आनंद, हे सूत्र तर आपल्या प्रत्येक बापू भक्ताला माहितच आहे.

जर मी एकटा रक्तादानासाठी जाणार असेन तर गुणसंकिर्तानाने कमित कमी पाच जनांना घेवुनच येईन.
मला फ़क्त श्रद्धेने पहिले पावुल उचलायचे आहे बाकि सर्व बापुच सबुरिने हळुहळु करून घेणारच  आहे.


प्रयत्न करने माझे काम I यशदाता मंगल धाम ||

अंती तोचि देइल विश्राम I चिंतेचा उपशम होइल ||

यावर्षी रविवार दिनांक 27 एप्रिल 2014 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

स्थळ:- प्रायव्हेट हायस्कुल , केशवराव भोसले नाट्यगृहासमोर , खासबाग , मंगळवार पेठ, कोल्हापूर . 

वेळ:- सकाळी 9 ते दुपारी २ वाजेपर्यंत.

No comments:

Post a Comment